Monday, November 21, 2016

२ स्वामी कथा ~संपादक अनंत देव।







स्वामी चोळप्पाच्या मुलांबरोबर गोट्या खेळतात.स्वामी म्हणतात-"जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिझे ! लक्ष केंद्रित करावं लागतं."
खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच.चोळप्पाची सासू पारायण करत असते, तिला त्रास होतो. चोळप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात,
निदान थोड्या वेळपर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते.
स्वामी मान्य करतात.पण समझ पण देतात-"पारायण करताना खेळाचा आवाज ऐकु तरी कसा येतो ? कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. देवाचे नाव घेताताना तर ती उच्च पातळीची हवी."
चोळप्पा आपल्या एक स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो.वामन बुवा स्वामींना पहातच राहतात.
एका मुलाला भूख लागली म्हणून स्वामी आतून नेवेद्याचे अन्न आणून घास भरवतात.
नेवेद्याचे अन्न आणताना ,चोल्प्पाची सासू विरोध करते.पण स्वामी दुमानत नाही. स्वामी सांगतात:"पोथी नुसती वाचू नका आचरणात आणा. अंधश्रद्धा, सोवळं-ओवळं यांच्या जास्त नादी लागू नका.चोळप्पाची पत्नी आणि सासू चोळप्पाशी तक्रार करतात पण चोळप्पा काही ऐकत नाही.
तिकडे शास्त्रीबुवा वामनबुवांना स्वामी बद्दल घालुन-पाडुन बोलतात.मग ते वामनबुवाला घेऊन आपल्या गुरु घोलपस्वामी कडे जातात.
घोलपस्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात. वामनबुवा चमत्काराला दुमानत नाही. उलट ते घोलपस्वामींना,आपल्या गुरु स्वामीसमर्था बद्दल सांगतात.
घोलपस्वामी सोन्याचं लालूच देऊन आपला शिष्य करू असं पाहतात. वामनबुवा आणि घोलपस्वामी यांच्यात वाद विवाद होतो. जाता-जाता वामन बुवा सांगून जातात कि माझे गुरु येईल तुमची परीक्षा पहायला.
इकडे स्वामी चोळप्पाला गांवो-गाव फिरून आपला उपदेश जन-सामान्यात आपला उपदेश पोचंव, असं सांगतात-"तू सर्वाना समर्पण शिकवू शकतो. वामनाला पण तू दीक्षा दिली.खूप सोसले आहे त्यांनी माझ्या साठी.मी त्याच्या पाठीशी आहे. "
[12/29, 6:47 AM] Anant Deo: तिकडे शास्त्रीबुवा घोलपस्वामी कडे दगडं घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात.अर्ध सोनं आम्ही घेऊ अश्या अटीवर घोलपस्वामी,आपले प्रयत्न सुरु करतात. पण काय,काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही,त्यांना वाटतं कि वामनबुवांनी आपली विद्या हिरावली आहे,म्हणून सूड घ्यायला घोलपस्वामी धर्मशाळेत जातात.
घोलप एक मोठा धोंडा घेऊन वामन बुवांवर टाकायला जातात. पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणी उलट तेच स्वता पडून त्याचं धोंड्या खाली चिरडले जातात.
धोंड्याच्या आवाजांनी वामन बुवा जागे होतात. त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते,ते मनो-मन स्वामींना आपले रक्षण केल्या बद्दल धन्यवाद देतात.
काही वेळानी घोलप जागे होतात, त्यांना स्वामींच्या सामर्थाची प्रचीती येते.
ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात.
स्वामी बोध करतात: "घोलप, आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये.अरे आपले सामर्थ आणी शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणा करता करावा."
"त्यांना धर्म-प्रवृत्त करण्यात करावा."
"ब्रह्मचा अंतिम सत्य आहे बाकी सर्व क्षण भंगुर आहे' ह्या गोष्टीची जाणीव सर्वाना करुन द्यायला हवी."
स्वामी घोलपना माहूर ला जान राहायची आज्ञा करतात.
पहिले घोलप यांना स्वामी-चरण सोडुन जाणे जीवावर येतं पण मग ते बारकाई नी  विचार करतात कि माहूरला आदिमायेच्या रुपात स्वामीच आहे,
 असे समझुन ते माहूर साठी प्रस्थान करतात.
स्वामी मग वामन बुवाचे कौतुक करतात.
स्वामी म्हणतात: "अरे इतके प्रलोभन वाहत असताना सुद्धा तु तटस्थ राहिला, गुरुवर निष्ट आढळ ठेवली."
"तु परीक्षेत उतीर्ण झाला आहे."
"तुझी मोक्षाची वाटचाल आता सुरु झाली आहे."



बाळप्पाची स्वामीभेट


कोंडुनाना स्वामींशी तीर्थयात्रे साठी परवानगी मागतात. स्वामी होकार देतात आणि म्हणतात: "जा पण आमच्या श्वानाला पण घेऊन ये."
कोंडु नानाला पाहून चोळप्पा पण तुळजापूरला भवानी मातेचे दर्शन करण्या साठी आज्ञा मागतो.
स्वामी चोळप्पाला तुळजापूरच्या भवानी मातेचे रूप दाखवतात.
चोळप्पा गहिवरून म्हणतो:-"स्वामी ३३ कोटी देव माझ्या समोर असतांना मी उगीच तीर्थ यात्रेची कामना केली हो !"
कोंडुनाना गाणगापूरला येतात. तहानेनी व्याकुळ होऊन ते विहिरीतून पाणी काढून प्यायला जातात.
जसच पाणी काढले जाते, त्यांच्या कम्भरेत एक लात पडते.
मागे पाहतात तर काय घोड्यावर बसलेला एका इंग्रजांनी ती लात मारली होती.
ती विहीर ब्रिटीश अधिकाऱ्यांना पाणी-पुरवठा करण्यासाठी होती, आणि सत्तेत आंधळे झालेल्या इंग्रजांनला 
एका गरीब भारतीयांनी त्यातून पाणी घेतलेले सहन झाले नाही.
बाळप्पा कोंडुनानाला हात देऊन उचलतात आणि धर्मशाळेत नेतात.
  बालप्पा श्रीमंत घराचे असतात,त्यांचा मोठ्ठा कारोबार असतो आणि ते घर आणि व्यवसाय सोडून 
गुरूच्या शोधात बाहेर निघालेले असतात.
कोंडुनानांना बाळप्पाला भेटुन  कळते कि स्वामिनी ज्या श्वानाला आण म्हटले ते हेच.
ते बाळप्पाना म्हणतात कि तुमचा गुरूचा शोध संपला, अक्कलकोट चे स्वामींनी तुम्हाला बोलावले आहे.
बाळप्पा अक्कलकोटला यायला तैयार होतात.
पण रात्री स्वप्नात दृष्टांत देऊन स्वामी बाळप्पाला म्हणतात:-" उतावळा होऊ नको. भेटेची वेळ अजून आली नाही."
तिकडे त्या इंग्रजाला अकस्मात पायात इजा होते-ज्या पायांनी लात मारली त्याच पायात.
रस्त्यात भेट झाल्यावर इंग्रज आपले दुख कोंडु नानाला सांगतो.कोन्दुंना त्याल स्वामींच्या शरणी ये असे सांगतात.
इंग्रज अधिकारी कोंडु नाना बरोबर अक्कलकोटला येतो. बाळप्पा गाणगापुरलाच  राहूनच आराधना करतात.
इंग्रज अक्कलकोटला स्वामींच्या चरणात पडून म्हणतो कि स्वामी मला स्पर्श करून बरं करा.
स्वामी म्हणतात: "अरे पहिले आम्हाला लाता मारतो आणि आता चरणानी स्पर्श करा असे म्हणतो!"
इंग्रज म्हणतो: " मी केंव्हातुम्हाला लात मारली?"
स्वमी म्हणतात: ' आम्ही आमच्या भक्तांच्या ठाई वास करतो. आणि तू आमच्या भक्ताला लात मारली."
इंग्रज  आपली चूक मान्य करतो.
मग स्वामी उपाय सांगतात: " तांदूळ धुतलेले पाणी आणि वाटलेले आळू चे कांदे एकत्र करून लाव तुझा पाय बरा होईल."
तिकडे धर्मशाळेत बाळप्पा पाण्याच्या नांदीत बुडत असलेल्या विन्चुला पाहतात.
त्या विन्चुचे प्राण वाचवायला बाळप्पा त्याला हातानी बाहेर काढतात.या प्रयत्नात विंचू त्यांना चावतो पण बाळप्पा त्याला बाहेर काढतात.
स्वामी बाळप्पाला  दृष्टांत देऊन सांगत्तात: "बाळप्पा तू परीक्षेत उतीर्ण झाला".
बाळप्पा ठरवतात कि जर एका हि घरात भिक्षेत जर गव्हाच्या पोळ्या मिळाल्या तर यालाच 
स्वामींची आज्ञा मानून अक्कलकोटला प्रस्थान करायचं.
  शेवटी एका घरात गव्हाच्या पोळ्या मिळतात आणि बालप्पा अक्कलकोटला येतात.
बाळप्पा नी आणलेली खाडी साखर स्वामी सर्वाना देतात पण बाळप्पाला देत नाही.
स्वामी म्हणता: " बाळप्पा इथे राहणे सोपे नाही. तुला स्वताला सिद्ध करावे लागेल."
त्यानंतर बाळप्पा गुरु सेवेला लागतात आणि लहान-मोठे सर्व कार्य करायला लागतात.

बाळप्पा श्रीमंत घरातले असल्यानी, स्वामी नी हे हि योजना केलेली होती.

No comments:

Post a Comment